अमिताभच्या मते बॉलिवूड सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारी उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते व त्याचा आम्हाला सार्थ अभिमानही आहे. मात्र नफा मिळविण्यात आम्ही कमी पडतो आहोत कारण आपल्या चित्रपटांचे चांगले मार्केटिंग करण्याची कला आम्हाला गवसलेली नाही. त्याची कौशल्ये आमच्याकडे नाहीत व त्यात हॉलीवूडने बाजी मारली आहे. वास्तविक चित्रपटाची कथा कशी फुलवायची याचे कौशल्य आपल्याकडे आहे.