'बालिकावधू' या कार्यक्रमातून 'आनंदी'ची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकणार्या प्रत्युषा बॅनर्जी हिने या जगाचा निरोप घेतला. प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूमुळे टीव्ही कलाकारांना मोठा धक्का बसला सहकलाकारांनी तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मात्र तिने आत्महत्या केली यावर अद्याप कोणाचाच विश्वास बसला नसून तिच्यासारखी खंबीर मुलगी असे पाऊल उचलणार नाही, असेच अनेकांचे म्हणणे आहे.