'नच बलिये -७' पर्वाच्या यशाने अमृताने हिंदी सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला. सध्या चर्चेत असलेल्या "बाजीराव मस्तानी" या सिनेमाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाचा उल्लेख यासाठी करावासा वाटतोय, कारण या कार्यक्रमाची शो अँकर अमृता खानविलकर होती. रणवीर, प्रियांका, दीपिका या त्रिकुटाला घेऊन संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी हा सिनेमा बनवला आहे. मराठ्यांचा पेशवेकाळ या सिनेमात साकारला आहे.
मुळातच हा सिनेमा मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा असल्याने या कार्यक्रमाची थीमही मराठमोळी होती. त्यामुळे या सिनेमाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याऱ्या अमृतानेही मराठी संस्कृतीला शोभेल असा पेहराव केला होता. या कार्यक्रमात अमृताने रणवीर आणि प्रियांका यांच्यासोबत खूप धमाल केली. या कार्यक्रमाची रंगत वाढविताना तिने रणवीरच्या मल्हारी तर प्रियांकाच्या पिंगा या गाण्यावर त्यांच्यासोबत काही स्टेप्सही केल्या.