भारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. त्यासाठी रेल्वेने तिरुअनंतपुरमला जावे लागते. तिथून खासगी कार करून करेळ-कन्याकुमारी करून कोचीनला जावे. लक्षद्वीपला जाताना कोचीन बंदरावरून जावे लागते. तिथून मग मिनीकॉय बोटीमधून प्रवासाला सुरुवात होते. कोचीन ते लक्षद्वीप हा 18 तासांचा सागरी प्रवस असतो. बोटीमध्ये साधारण दीडशे लोक बसतील, अशी व्यवस्था असते.
स्नॉर्कलिंग, कायकिंग यासारख्या खेळाच्या आनंद येथे घेता येतो. विशेष म्हणजे या सर्व खेळांसाठी पोहता येणे बंधनकारक नाही. लाइफ जॅकेट अंगात चढवून हा अनुभव घेता येतो. विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे, जिवंच कोरल्स, स्टारफिश, समुद्री काकड्या, खेकडे या सर्वांनी संपन्न अशी ही बेटे वेगळाच अनुभव देतात.