सर्वपितृ अमावस्या: हे 7 नियम पाळा, पितृ होतील तृप्त...

सर्वपितृ विसर्जनी अमावस्या किंवा महालय हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. शास्त्रांप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्मांना मोक्ष प्राप्त होतं. परंतू प्रत्येक काम एक उचित विधीने केल्याने पुण्य प्राप्त होतं. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्त्वाचे नियम पालन करून श्राद्ध क्रिया उचित प्रकारे करावी ज्याने पितरांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते.
 
नियम या प्रकारे आहेत:
 
1. दुसऱ्यांच्या निवास स्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये.
 
2. श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण द्वारे पूजा कर्म करवावं.
 
3. ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे संपूर्ण फल नष्ट होतात.
 
4. श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केलं जातं नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंड दान केलं जातं.
 
5. चांडाल आणि डुक्कर श्राद्धाच्या संपर्क आल्यास श्राद्धाचं अन्न दूषित होऊन जातं.
 
6. रात्री श्राद्ध करू नये.
 
7. संध्याकाळी आणि पूर्वाह्न काळात देखील श्राद्ध करणे उचित नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती