दहावीच्या परीक्षा रद्द, राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय

मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:22 IST)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १०वी ची परीक्षा रद्द करण्यात आली असून इंटर्नल असेसमेंट बाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच १२ वी ची परीक्षा होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती