दारूसाठी रांगा लावणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा, ते धान्य खरेदी करु शकतात

बुधवार, 6 मे 2020 (12:20 IST)
औरंगाबाद- दारू खरेदी करण्यासाठी रांगते लागणार्‍यांचे रेशन कार्ड रद्द करावे अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडं केली आहे. त्याच्याप्रमाणे दारुसाठी पैसा खर्च करणारे अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. 
 
लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात वाईन शॉप्स उघडण्याचा निर्णय चुकीचा असून या दरम्यान आरोग्याच्या दृष्टीनं किती नुकसान होतंय यावर जलील यांनी काळजी व्यक्त केली आहे. 
 

#liquor shame: did not allow a single liquor shop to open in aurangabad. Request govt to cancel ration cards of all those in queues to get liquor. They don’t need Govt ration. When they can buy liquor they can buy food too. Shame on Maha govt for this decision.

— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) May 4, 2020
उल्लेखनीय आहे की वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लागल्या आणि सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी झाली. परिणामस्वरुप मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती