मदत व बचाव कार्यासाठी राज्यात विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात

गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (15:34 IST)
मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीची परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीत नागरिकांची काळजी घेण्याच्या पार्श्वभूनिवर राज्य शासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
 
राज्यात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत ५, कोल्हापूरात ४, सांगलीत २, साताऱ्यात १, ठाण्यात १, पालघरमध्ये १, नागपूरात १, रायगडमध्ये १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती