काही उपयोगाच्या आरोग्य टिप्स

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (11:08 IST)
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत घेतल्यास गाठी मधील वेदना कमी होतात. 
स्थूलपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासही कारणीभूत ठरत असतो.
साधारणी महिनाभर सफरचंद खालल्याने स्नायूंना बळकटी येऊन दूर्बलता कमी होते.
धुने, स्वच्छता यासारखे कामे दररोज केल्यास रक्तातील चरबी सहजपणे कमी होते. 
फळे भरपूर खावीत, कारण फळांनी प्रतिकारशक्ती वाढते. भूक भागते व वजनही वाढत नाही. 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. 
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते. 
पिकलेल्या फळाचे बारीक तुकडे करून शेंदेलोण आणि काळी मिरी लावून खाण्याने अपचन दूर होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती