भुकेचा अवरोधही कधी करू नये

ND
दोन खाण्यांमध्ये कमीतकमी सहा तासांचं अंतर असावं. परंतु भुकेचा अवरोधही कधी करू नये. कारण त्यामुळंही व्याधींना आमंत्रण मिळतं. घनआहार जठरामधून आतड्यामध्ये जाण्याकरता लागणारा काळ हा तीन ते चार तासांचा आहे. म्हणून काही वेळेला भूक लागली असेल पण त्यावेळी खाण्यासाठी योग्य वेळ नसेल तर द्रवआहार घ्यावा. असा आहार अतिशय कमी वेळात जठरातून आतड्यात जातो. आणि भूक शमते.

वेबदुनिया वर वाचा