शिखर धवन वल्ड कप स्पर्धेतून बाहेर

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन हा संपूर्ण वल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ९ जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची खेळी केली होती.
 
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी टीम इंडियाने आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. धवनची दुखापत १०-१२ दिवसात बरी होईल, असा अंदाज होता. पण धवनची दुखापत बरी व्हायला ४ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे.
 
शिखर धवनऐवजी ऋषभ पंत याची टीममध्ये निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणऊन पाठवण्यात आलं होतं. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती