टाटा ग्रुपचा होईल का एअर इंडिया ? कर्जबाजारी एअरलाईन्सवर या महिन्यात बोली दाखल केली जाईल

सोमवार, 5 एप्रिल 2021 (16:12 IST)
सरकारी विमानन कंपनी एअर इंडिया खरेदी करण्याच्या शर्यतीत टाटा सन्स लिमिटेड आणि सरकार यांच्यात करार पूर्ण होण्यास फारसा उशीर दिसला नाही. या महिन्याच्या अखेरीस टाटा आपली बोली दाखल करणार असल्याचे सूत्रांनी उघड केले आहे. सरकारला कर्जबाजारी एअर इंडिया विकायची आहे.2007मध्ये सरकारी विमान कंपन्या विलिनीकरणानंतर विमान कंपनीचा वार्षिक नफा कमी झाला.
 
येत्या काही वर्षांत एअर इंडियाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत कंपनीची मालकी हा कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील विषय आहे. त्यांची मालकी कोणाकडेही जावी अशी त्यांची इच्छा आहे पण सरकारने पेन्शनशी संबंधित बाबींची काळजी घेतली पाहिजे.
 
टाटा समूहाने एअर इंडियाची सुरुवात केली
एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. नंतर 1953 मध्ये ते सरकारला विकण्यात आले. आता पुन्हा एकदा टाटा समूहाला एअर इंडियाला आपले बनवायचे आहे. सरकारला आशा आहे की, एअर इंडियाचे निर्गुंतवणूक पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या  तिमाहीत पूर्ण होईल.
 
एअर इंडिया कर्जात आहे
एअर इंडियावर सध्या 90000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. चालू आर्थिक वर्षात एअर इंडिया १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीची नोंद घेईल असा अंदाज आहे. टाटा समूह एअर इंडियासाठी आपली बोली एअर एशिया इंडियाच्या मार्फत लावण्याचा विचार करीत आहे. टाटा समूहाची एअर एशिया इंडियामध्ये नियंत्रण आहे. मिडल ईस्ट सॉवरेन फडांसह अजय सिंग यांची एअर इंडिया खरेदी करण्याची योजना आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती