रिलायंस बनली भारतातील नफा कमावणारी सर्वात मोठी कंपनी, रिलायंस AGM चे मुख्य अंश

सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (13:00 IST)
रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमेन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 42व्या वार्षिक बैठक (AGM) ला संबोधित करत म्हटले आहे की भारतातील नफा कमावणारी सर्वात मोठी कंपनी रिलायंस बनली आहे. रिलायंस AGM मध्ये मुकेश अंबानी यांच्या भाषणाचे मुख्य अंश :
 
जिओ फायबर 5 सप्टेंबरला होईल लाँच
 
- जिओ फायबर कमर्शियल बेसिसवर 5 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी जिओला 3 वर्ष पूर्ण होतील.
 
- वित्त वर्ष 2019-20पासून नवीन बिझनेसहून महसूल येणे सुरू होईल.
 
- जिजो गीगा फायबर 20 मिलियन घरापर्यंत पोहोचेल
 
- साउदी अरामको 5,00,000 बॅरेल क्रूड ऑयल रिलायंस रिफायनरीला सप्लाय करेल.
 
- मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की फ्यूल रिटेल बिझनेसमध्ये 49 टक्के भागीदारी विकल्यामुळे 7000 कोटी रुपये मिळतील.
 
5 सप्टेंबर रोजी जिओ लाँच हून 3 वर्ष होतील
5 सप्टेंबर रोजी जिओला 3 वर्ष होतील. जिओचे 340 मिलियन यूजर आहे. मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की इंडियामध्ये जिओ देशातील सर्वात मोठा ऑपरेटर आहे आणि जगातील दुसरा मोठा ऑपरेटर आहे.
 
जिओमध्ये गुंतवणूक सायकिल झाले समाप्त
गुंतवणूक सायकिल जिओ ने पूर्ण केले आहे. आता जिओमध्ये फक्त मार्जिनल गुंतवणूक असेल.
 
साउदी अरामको रिलायंसमध्ये 20 टक्के भागीदारीसाठी करेल निवेश
 
रिलायंस जिओ फोन 3
जिओ आल्यानंतरच त्याच्या फोन फार लोकप्रिय झाला आहे. रिलायंस जिओ आतापर्यंत दोन स्मार्ट फीचर फोन लाँच करून चुकली आहे. आता असे मानले जात आहे की यंदा कंपनी जिओ फोन 3 (Jio Phone 3)ला लाँच करू शकते. आधी जियो फोन 2 मध्ये कंपनी यूट्यूब, व्हाट्सएप, फेसबुक इत्यादी सारखे फीचर्स देखील देत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती