अटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये

शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:02 IST)
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी वाजपेयी कविमनाचे साहित्यिकही होते. त्यामुळे आजवर त्यांच्या अशा अनेक कविता आहेत ज्यांचा समावेश बॉलिवूडमध्येही करण्यात आला होता. त्यांची प्रसिद्ध आणि लोकप्रिय कविता ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये करण्यात आला आहे. या कवितेला गझलकार जगजीत सिंह यांचा सुरेल आवाज लाभला आहे. या गाण्यामध्ये अभिनेता शाहरुख खान झळकला असून या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच अटलजी बॉलिवूडच्या पडद्यावर झळकले होते.
 
अटलजी यांच्या कवितेचा समावेश करण्यात आलेल्या अल्बमचं नाव ‘संवेदना’असं असून या अल्बमच्या सुरुवातीला बॉलिवूडला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्यात आला आहे. यावेळी अमिताभ यांच्या आवाजाबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांचे काही फोटोही दाखविण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती