गेली 30 वर्षं आम्ही हे ओझं वाहत होतो: शिवसेना

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपावर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. "ओझे उतरले" नावाच्या या अग्रलेखामध्ये शिवसेना भाजपाबरोबर येईल ही अपेक्षा सोडून द्यावी असा सल्लाही या अग्रलेखातून दिला आहे.
 
या2019मध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही. महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
 
आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचे तसेही ओझे होतेच. तेही उतरले असे 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटले आहे.
 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हा प्रयोग गेली 30 वर्षं चालला होता. आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत अशी डबडी वाजवणे बंद केले पाहिजे, अशी टीका सामनाने अग्रलेखातून केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती