देशातील सर्व नागरिकांना लस द्या- राहुल गांधी

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (16:03 IST)
लसीकरणाबद्दल देशभरातील विविध पक्षांचे नेते केंद्र सरकारकडे मागण्या नोंदवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक राज्य सरकारांनीही आपापल्या मागण्या केंद्राकडे नोंदवल्या आहेत.
 
कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आता लसीकरणाच्या चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही प्रवेश केला आहे.
 
गरज आणि मागण्यांवर वाद घालणे चुकीचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटची काल दिवसभर चर्चा सुरू होती. हे वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती